आचार्य चाणक्य एक महान राजकारणी व्यक्तिमत्त्व
भारताच्या रचनात्मक बुद्धीचे प्रतिक म्हणजेच आचार्य चाणक्य. आचार्य चाणक्य हे एक असे व्यक्तिमत्त्व होते ज्यांनी स्वतःच्या शिष्यवृत्ती आणि क्षमतांद्वारे भारतीय इतिहासाचे वर्तमान बदलले होते. मौर्य समाज्याचे संस्थापक चाणक्य हे एक कुशल राजकारणी, कौटिलीय अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्र म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांची ही विचारधारा सामान्य जनतेसाठी एक मार्गदर्शन म्हणून मानली जाते. आचार्य चाणक्य यांना विष्णूगुप्ता किंवा कौटिल्य देखील म्हटले जात होते. प्राचीन
भारताचं
राजकीय
आणि
कुटनीती
शास्त्राचा
पाया
त्यांनी
घातला.
चाणक्य
नीतीमधील
काही
तत्व
आजही
राजकारणात
वापरली
जातात.
भारतीय
राजकारणात
भारतीय
राजकारणाच्या
सट्टेबाजीची
युक्ती
यशस्वीरीत्या
हाताळली
जाणारी
चाणक्य
ही
पहिली
व्यक्ति
आहे.
चाणक्याच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत.
चाणक्य अथवा विष्णुगुप्त हा पाटलीपुत्रमधील 'चणक' या प्रतिभावान शिक्षकाचा मुलगा होता. नंद राजवटीवर टीका केल्याने राजद्रोहाबद्दल चणक यांना अटक झाली व त्यांचा कारावासात मृत्यु झाला. पाटलीपुत्र शहरात नंद राजवटीत चणक परिवाराचे जगणे असह्य झाल्याने विष्णुगुप्ताने तक्षशिलेला प्रयाण केले. तक्षशिला येथील विद्यापीठात शिक्षण पूर्ण केल्यानंतर आचार्य चाणक्य यांनी तक्षशिला विद्यापीठातच राजनीती व अर्थशास्त्र या विषयांवर अध्यापन सुरू केले व अत्यंत प्रभावी शिक्षक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. राजनीती व अर्थशास्त्र हे विषय शिकवत असल्याने भारतातील अनेक राज्यांचे मंत्री चाणक्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले त्यामुळे कोणत्याही राज्याशी निगडित नसूनही चाणक्याचे नाव भारताच्या राजकीय वर्तुळात आदराने घेतले जाई. तसेच चंद्रगुप्त मौर्य साम्राज्य उभारण्यासाठी आर्य चाणक्य यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळे मौर्य साम्राज्य एक प्रभावी साम्राज्य म्हणूनही उदयास आलं.
आर्य चाणक्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान हे चाणक्य नीती या नावाने विख्यात आहे. जगभर आजही चाणक्यनीतीकडे कुतूहलाने आणि आदराने पाहिले जाते. राजकारण आणि कूटनीतीतही त्यांनी प्रचंड कार्य केले आहे. आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांची रचना केली. त्यात नीतीशास्त्रावरील ग्रंथाचाही समावेश आहे. नीतीशास्त्रावरील ग्रंथ म्हणजेच चाणक्य नीती.

Comments
Post a Comment