Posts

Showing posts from April, 2019

किवी या फळामध्ये नक्की दडलयं काय?

Image
आरोग्यासाठी फळे ही सर्वात उत्तम असतात आता सर्वानीच मान्य केले आहे . आंबा सफरचंद संत्री केळी किलगड अशा आपल्याकडच्या फळांचे गुण सर्वसाधारणपणे माहिती असतात . मात्र गेल्या दोनेक वर्षांत थायलंड - मलेशिया - चीनवरून येत असलेल्या विदेशी फळांनी बाजारात लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली आहे .  सर्वांत जास्त लक्षवेधनार फळ म्हणजे किवी … न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळख असलेला किवीशी साधर्म असल्यामुळे याचे नाव किवी ठेवण्यात आले आहे . या फळाची लागवड न्यूझीलंड , फ्रान्स , इटली , जपान व अमेरिकेत जास्त होते .  आता भारतातही उत्तर व ईशान्येकडील भारतातील राज्यात लागवड करून निर्यातही केली जाते . साधारणत ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत किवीचा मोसम असतो . किवी फळाचे फायदे किवीमध्ये ‘ क ’ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचे व शरीरातील कमकुवत पेशींना सुदृढ बनवण्याचे काम करते तसेच शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते . संधिवात , दमा, आमवात यासारख्य...

आंबा फळांचा राजा का आहे वैशिष्ट्य जाणून घ्या

Image
उन्हाळा येताच चाहूल लागते ती फळांच्या राजाच्या आगमनाची म्हणजेच आंबा … अवीट गोडीच्या या फळाला ‘कोकणचा राजा’ असं म्हणतात. या फळाचा मोसम एप्रिल ते जून हा आहे. असं असलं तरी आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे सांगता येत नाही. दक्षिण अणि दक्षिण पूर्व आशियामध्ये मोठया प्रमाणात जैववैविध्य पाहता इथेच उगम झाल्याचं मानण्यात येतं.  दक्षिण आशिया तथाभारताच्या संस्कृतीत आंब्याला विशेष महत्त्व आहे. आंबा हे भारत आणि पाकिस्तान देशांचं ‘राष्ट्रीय फळ’ आहे तर बांगलादेशचं ‘राष्ट्रीय झाड’ आणि फिलिपाइन्सचं ‘राष्ट्रचिन्ह’ आहे.  भारतात आंब्याच्या हापूस, पायरी, तोतापुरी, केशर, फर्नाडिस, रायवळ इ. जाती आहेत. कच्च्या आंब्याला ‘कैरी’ असं म्हणतात कैरीचा रंग साधारणपणे हिरवा असतो तर पूर्ण पक्व फळाचा रंग पिवळा केशरी आणि लाल असा बदलता दिसून येतो. आंब्याच्या फुलांना मोहर असे म्हंटले जाते. त्याला एक प्रकारचा मंद सुवास असतो. आंब्याचे फळ हे वनस्पतीशास्त्रातील या प्रकारातील असते. या प्रकारात फळाच्या बाहेरील भागात गर असून आतमध्ये कोय असते.आंब्याच्या गरात थायमीन, नायसिन, रिबोफ्लेवीन, पायरीडॉक्सीन असतं. तर खनिजांपै...

आचार्य चाणक्य एक महान राजकारणी व्यक्तिमत्त्व

Image
भारताच्या रचनात्मक बुद्धीचे प्रतिक म्हणजेच आचार्य चाणक्य . आचार्य चाणक्य हे एक असे व्यक्तिमत्त्व होते ज्यांनी स्वतःच्या शिष्यवृत्ती आणि क्षमतांद्वारे भारतीय इतिहासाचे वर्तमान बदलले होते . मौर्य समाज्याचे संस्थापक चाणक्य हे एक कुशल राजकारणी , कौटिलीय अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्र म्हणूनही प्रसिद्ध आहेत . त्यांची ही विचारधारा सामान्य जनतेसाठी एक मार्गदर्शन म्हणून मानली जाते . आचार्य चाणक्य यांना विष्णूगुप्ता किंवा कौटिल्य देखील म्हटले जात होते .   प्राचीन भारताचं राजकीय आणि कुटनीती शास्त्राचा पाया त्यांनी घातला . चाणक्य नीतीमधील काही तत्व आजही राजकारणात वापरली जातात . भारतीय राजकारणात भारतीय राजकारणाच्या सट्टेबाजीची युक्ती यशस्वीरीत्या हाताळली जाणारी चाणक्य ही पहिली व्यक्ति आहे . चाणक्याच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत . चाणक्य अथवा विष्णुगुप्त हा   पाटलीपुत्रमधील ' चणक ' या प्रतिभावान शिक्षकाचा मुलगा होता . नंद राजवटीवर टीका केल्याने राजद्रोहाब...

शरीर निरोगी राखण्यासाठी काय करावे

Image
आजारी पडायला कुणालाही आवडत नाही . कारण त्यामुळं सगळ्यांनाच त्रास होतो आणि खर्चही वाढतो . आजारपणात दुसऱ्यांना आपली काळजी घ्यावी लागू शकते ; औषधोपचारासाठी बराच खर्च होऊ शकतो . “ इलाजापेक्षा प्रतिबंध बरा ,” अशी एक म्हण आहे ; म्हणजे आजारी पडून उपचार करण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी . निरोगी राहण्यासाठी काही गोष्टी आहेत ज्यांचा उपयोग आपण दैनंदीन जीवनात केला पाहिजे. १. कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि मध मिसळून प्यायल्याने पचनसंस्था स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत होते. तसेच वजन कमी होण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. २ . लसणाच्या तीन पाकळ्या चघळून त्यावर कपभर लिंबूपाणी प्यायल्याने लठठपणा कमी होण्यास मदत होते . हा प्रयोग रिकाम्यापोटी केल्याने शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधरते . ३ . सकाळी किमान एक खजूर रिकाम्यापोटी खाल्याने अ ‍ ॅनिमियाचा त्रास कमी होतो . खजूरमधील आयर्न घटक हिमोग्लोबीन नियंत्रणात आणतात . ४ . कढीपत्त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते . इन्सुलिनच्या निर्मितीचेही ...